बाजीप्रभु देशपांडे समाधी 

मी आणि माझा मित्र प्रवीण शिर्के  काही दिवसा पूर्वी विशाळगड वर बाजी प्रभू ची समाधी पाहण्यासाठी गेलो होतो .मनात फक्त  बाजी आणि त्यांच्या मावळ्यांच्या शोर्याचा पराक्रम डोक्यात होता .गड चढत चढत विचार येत होते की कशी असेल  बाजी प्रभू समाधी आणि आत्ता अधिकच उत्सुकता वाढतच होती. त्या पावन खिंडतील बाजीचे शब्द मनात गोधळू लागले होते.. 

राजे तुम्ही निम्मे मावळे घेवून विशाळ गड घाटा मी येथेच तुम्ही विशालगडा वर पोहचे पर्यंत हि खिड लढवतो

लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशीदा जगाला पाहिजे, आज एक बाजी मेला तर अशी लाखो बाजी तयार होतील राजे तुम्ही विशालगड गाठा 

 आम्ही गडावर जाताच क्षणी बाजी प्रभू समाधी समाधीची चौकशी केली कि ती कोठे आहे पण तेथील काहीनी  सागितले कि आम्हाला माहित नाही आणि काहींनी सागितले जरा पुढे आहे .असे करत करत आम्हाला १.३० ते २ तास लागले समाधी शोधण्यासाठी ती गडाच्या एका बाजूला एकाकी पडलेली  तिकडे कोणीही जात नाही  आणि फिरकत हि नाही पाहतो तर काय ज्या बाजी - फुलाजी बंधूंवर महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अशा या बाजी - फुलाजी यांची समाधी अशी धूळ ,उन ,वारा खात खितपत पडली आहे .त्या समाधीवर एक फाटका रंग उडलेला भगवा धज्व मन भारावून गेले आणि अलगद डोळ्यातून एक अश्रू आला कि हि ती समाधी ज्या माणसाने शिवरायांसाठी सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि अखेर महाराज विशाळ गड वर पोहचल्यावरच प्राण सोडला  ह्याची हि अवस्था पाहून मनात आले कि कसला मराठी पणा आणि बाणा ज्या माणसाची  समाधी  ह्या  सोन्याच्या हव्या होत्या परंतु काही विचित्र चित्र नजरेस पडाले . आम्ही सर्वजन फक्त एकामेकाकडे पाहत होतो आम्हाला काहीच सुचत नव्हते.एक वाक्य मनात सारखे येत होते कि 
लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशीदा जगाला पाहिजे आज एक बाजी मेला तर अशी लाखो बाजी तयार होतील राजे तुम्ही विशालगड गाठा
       मराठ्यांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली  त्या बाजीच्या समाधी पुढे नतमस्त झालो आणि अलगद एक अश्रू  डोळ्यातून बाजीच्या समाधी वर पडला अंग भरून आले होते काय करावे हे समजत नव्हते शेवटी तेथील साफसफाई करू लागलो . काही वेळ चिंतन करून निराश मनाने माघारी फिरलो .

       आज आपलीच माणसे हि त्या विशाळ गड वर येतात पण बाजी समाधी कडे कोणीही फिरत नाही हि आजची वस्तुस्तीथी आहे . 


सूरज बबन थोरात 



posted under |

0 comments :

Newer Post Older Post Home

वाचक

Designed by WebQuest. Powered by Blogger.

सह्याद्रि

Blog Archive

Followers


Recent Comments